पेरण्यांसाठी शेतकर्‍यांनी घाई करू नये   

कृषी विभागाकडून आवाहन 

पुणे : मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार हजेरीमुळे उन्हाळी हंगामातील पिकांचे एकीकडे मोठे नुकसान झाले तर दुसर्‍या बाजूला खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी पाऊस फायदेशीर झालेला असला तरी जमिनीला पुरेसा वाफसा असल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरण्या करून नयेत, असा सल्ला राज्य शासनाच्या कृषी विभागांकडून शेतकर्‍यांना दिला आहे.
 
पिकांच्या पेरण्यांसाठी शेतकर्‍यांनी घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. मे महिन्यात राज्यात सरासरी विक्रमी म्हणजे १४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात तर पेरण्यांसाठी वाफसा येण्यास १० ते १५ दिवसांपेक्षा अधिक काळ लागू शकतो. त्यामुळे पेरण्यांसाठी पोषक स्थिती राहिल. वाफसा आल्यानंतरच शेतकर्‍यांनी पिकांच्या पेरण्यांना प्राधान्य द्यावे. काही ठिकाणी खूपच पाऊस झालेला असला तरी काही भागात ८० ते १०० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांसाठी पुरेसा ओलावा जमिनीत नाही. त्यादृष्टीने १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकर्‍यांनी पेरण्या कराव्यात, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Related Articles